महिला दिन बद्दल दोन शब्द ........
८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला. तो पास झाला.त्या अनुषंगाने भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस (८ मार्च) १९४३ साली साजरा झाला. १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या; मात्र एवढ्या वर्षांत परिस्थिती काही प्रमाणात आणि काही भागातच बदललेली दिसते आहे.मग यास खर्या अर्थाने जबाबदार कोण?
आपण महिला दिवस आजही प्रामुख्याने साजरा करतो पण हेतु कदाचित बदललेला नाही कारण महिला दिवस म्हणल की महिलांची खरेदी वाढावी म्हणून आकर्षक सेल ठेवतात.यावरून कुठेतरी अस दिसून येत की महिला दिवस फक्त दसरा दिवाळी ला ज्या पद्धतीने खरेदी करून उत्सव साजरा केला जातो अगदी तसाच उत्सव आपण महिला दिवस ला समजून साजरा करतो आहोत.व यामागचा उद्देश ही व्यापारी च दिसून येतो. एकंदरीत काय तर आपण महिला दिवसाचे महत्व समजून घेतलेलच नाही अस म्हणता येईल.आज आपल्या समाजात स्त्रियांना पुरुषांबरोबर काम करण्याचे स्थान प्राप्त झालेले आहे त्यामुळे त्यांनाही आदर मिळतो आहे.पण काही ठिकाणी आजही स्त्रियांना मानाचा दर्जाप्राप्त नाही.मग अशा ठिकाणी शिक्षित स्त्रिया देखील कानाडोळा करत अन्याय हा सहन करतात. उदा. महाविद्यालय प्रांगणा मध्ये पाहिल असता चिकू च्या बिया एवढे डोळे उघडे ठेवून मुली वावरत असताना आपणास दिसून येईल. पण त्याच मुली लहान असताना शाळेच्या मैदानात अतिशय स्वतंत्र पणे वावगत असताना दिसून येतील.मग यावरून असे वाटते की मुली मोठी होता होता पारतंत्र्यात का जातात. का त्याही समाजाचा अतिशय निडर पणाने सामना करत नाहीत?
मान्य आहे संस्कृती पुरुष प्रधान आहे पण पुरुष घडवण्यात व त्याला संस्कृती पुरुष प्रधान आहे म्हणून शिकवण्यात ही स्त्रीच जबाबदार असते असे मला प्रामुख्याने वाटते. कारण पाल्याचा प्रथम गुरु ही एक स्त्री असते,मग त्या अनुषंगाने स्त्री का शिकवत नाही मुलास की मुली देखील तुझ्या समान आहेत व मुलीस की तूलाही परिपूर्ण स्वतंत्र आहे.
या सर्व प्रश्नाचे उत्तर समाज आहे. पण समाज हे फक्त पुरूषांचे मिळून तयार होत नसून समाज आपणा सर्वांचे मिळून तयार होते. त्यात स्त्री यांचा ही मोलाचा वाटा असतो. त्यास्तव या समाजाची मानसिकता बदलण्याची ताकत फक्त स्त्री मधेच आहे. असे मला वाटते. त्यामुळे प्रतेक स्त्री ने महिला दिवस हा उत्सव समजून साजरा न करता समाजा प्रती आपले काही देणे लागतो या विचाराने समोर येऊन कार्य करायला हव आणि समाजात चालत आलेल्या अशा रूढी परंपरेचा त्याग करायला हवा.
कौटिल्य ने सांगितलं आहे की पुरुषां पेक्षा स्त्रिया प्रतेक गुणांत दुप्पट असतात मग हे वाक्य ध्यानी ठेवून पुरुषांनी देखील स्त्रियांचं आदर केला पाहिजे कारण कौटिल्य सांगतात की स्त्री ही पुरुषांपेक्षा सहा पट वाईट ही असते. व आपणास ही माहीतच आहे की प्रतेक यशस्वी मनुष्याच्या मागे एका स्त्री च हात असतो. आणि त्या उलटही म्हणजेच प्रतेक बरबाद मनुष्याच्या मागे देखील स्त्री च असते त्यामुळे स्त्री यांचा आदर करा.
कारण महाविद्यालयाच्या प्रांगणात देखील परत एकदा ती मुलगी हसत खेळत वावरली पाहिजे एवढच........
Comments
Post a Comment